Home मुंबई आता बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा : ११ वी १२ वीच्या अभ्यासक्रमात...

आता बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा : ११ वी १२ वीच्या अभ्यासक्रमात बदल, सरकारचा नवा निर्णय

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

नवी दिल्ली :-  केंद्राने बुधवारी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) च्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल जाहीर केले. नवीन अभ्यासक्रम आराखडा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. २०२४ च्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असेही सांगण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाने म्हंटले आहे की इयत्ता ११ आणि १२ च्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.आणि त्यापैकी किमान एक हिंदुस्थानी भाषा असणे आवश्यक आहे.

मंत्रालयाने असंही म्हंटले आहे की बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, त्यात विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल